सरकार खरंच जर गोरगरिबांच्या पाठीशी आहे तर मग RTE कायद्यात बदल का?समाजसेवक अमोल केंद्रे यांचा सरकारला प्रश्न.
RTE कायद्यात बदल केल्याच्या निषेधार्थ आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात समाज सेवक अमोल केंद्रे यांनी सरकारला धारेवर धरले.तसेच अपेक्षित मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ही दिला.गोरगरीब,वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधिकारावर गदा आणन्याचे सरकारचे धोरण शेवटच्या क्षणापर्यंत सफल होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.